Best WishesEducationalUlhasnagar Breaking News

कुर्ला कॅम्प येथील महर्षी ग्लोबल स्कूल ही अनधिकृत शाळा बंद करा— म.न.वि.से

 




उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा 


स्थानिक प्राधिकरणाच्या परवानगीशिवाय कोणतीही शाळा सुरू केली जाऊ शकत नाही किंवा चालवली जाऊ शकत नाही, अशी स्पष्ट कायदेशीर तरतूद असतानाही उल्हासनगरातील पूर्ण कॅम्प या भागात महर्षी ग्लोबल स्कूल ही शाळा बिनदिक्कतपणे सुरू आहे. महानगरपालिका प्रशासन शाळेला कारवाईचे इशारे देणारे कागदी घोडे फक्त नाचवत आहे; किंबहुना ही अनधिकृत शाळा सुरू राहण्यामागे महापालिका प्रशासनाचाच सहभाग आहे, असा आमचा स्पष्ट आरोप आहे. सदरबाबत चौकशी होऊन संबंधितांवर कारवाई व्हावी व शाळा ताबडतोब बंद करावी व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणे रोखावे, यासाठी प्रस्तुत निवेदन आपणास देत आहे. 

९ एप्रिल २०२१ रोजी या शाळेला उल्हासनगर महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने पहिल्यांदा नोटीस बजावली होती. शाळा अनधिकृतपणे चालवण्यात येत आहे, असा स्पष्ट उल्लेख त्या नोटीशीत होता. शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार, शाळेला एक लाख रुपयांचा दंड तसंच पुढे प्रत्येक दिवसाला दहा हजार रुपये आकारले जाणार असल्याचा इशाराही नोटीशीत दिलेला होता. या नोटिशीला दीड वर्षे उलटून गेले आहे. परंतु ना शाळा बंद झाली, ना उल्हासनगर महानगरपालिकेने शाळेकडून छदामही दंड वसूल केला. 

शाळेविरोधात थेट कारवाई करण्याऐवजी, सदर भ्रष्टाचाराचा पाठपुरावा गेल्यानंतर ८ ऑगस्ट २०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेने शाळेला पुन्हा नोटीस दिली व पुन्हा दंड करण्याचा इशारा दिला आहे. यावरून स्पष्ट दिसते की महानगरपालिकेला बेकायदेशीर शाळा बंद करण्याबाबत कोणतेही स्वारस्य नाही.


आकारण्याऐवजी महानगरपालिका प्रशासन शाळेला पाठीशी घालत आहे. यात भ्रष्टाचार असल्याशिवाय महानगरपालिका अधिकारी कारवाई टाळाटाळ करत असतील, अशी शक्यता नाही. 

संबंधित बेकायदेशीर शाळा सुरू राहण्यामागे फक्त संबंधित संस्था व संचालक जबाबदार नसून या अपराधात महानगरपालिका प्रशासन सामील असल्याचे स्पष्टपणे दिसत असल्यामुळे त्याची चौकशी होणे व संबंधित अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करून शिस्तभंगाची कारवाई करणे गरजेचे आहे. सोबतच शाळा ताबडतोब बंद करून संचालकांविरोधात फौजदारी स्वरूपाची तसेच दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी या केली.


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रातील ग्लोबल महर्षी शाळा,उल्हासनगर -४ ही शासनाने अनधिकृत म्हणून घोषित केली असून सुद्धा अद्याप महापालिकेच्या शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारे कारवाई केली नाही याकरिता आज प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग यांची भेट घेऊन त्या शाळेवर त्वरित कारवाई करून शालेय व्यवस्थापना विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा ही मागणी जिल्हा उपाध्यक्ष अँड.कल्पेश माने यांनी केली,यावेळी मनविसे शहराध्यक्ष वैभव कुलकर्णी आणि मनसे विभाग अध्यक्ष सागर चव्हाण तसेच मनसे पदाधिकारी विजय पटेकर उपस्थित होते.

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights