उल्हासनगर पालिका प्रशासनाने सर्व सामान्य नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडवावे अन्यथा पंधरा दिवसानंतर मोर्चा आंदोलन करण्यात येईल—आमदार श्री गणपत गायकवाड
उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
उल्हासनगर शहररात मागील आठवड्यात उल्हासनगर वासीयांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी सर्व मंडळाचे अधिकारी पालिका आयुक्त यांची एकत्र बैठक आयोजित करण्यात आली होती. सर्व सामान्य जनता वारंवार तक्रारी करून सुद्धा पालिका प्रशासन जागे होत नसल्याने आमदारांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले होते. या संदर्भात काही पत्रकारांनी आमदार अधिकाऱ्यांशी उद्धट बोलतात अशी बातमी प्रसिद्ध केली होती.
त्याच अनुषंगाने आमदार श्री गणपत गायकवाड यांनी आज उल्हासनगर वासीयांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. काही नागरिकांनी त्यांना घरी होणारा पाणी पुरवठा हा अत्यंत गढूळ व कमी दाबाने होत असल्याचे सांगितले. जनतेचा लोक प्रतिनिधी म्हणून सर्व नागरिकांच्या प्रभाग निहाय भेटी घेऊन त्यांचे प्रश्न अधिकार्यांसमोर मी मांडणार आहेत. येत्या पंधरा दिवसात जर उल्हासनगर वासीयांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जर पालिका प्रशासनाने मार्गी लावला नाही तर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आमदार श्री गणपत गायकवाड यांनी दिला.