ArticleAwarenessBreaking NewsfeaturedfraudulentGadgetsheadlineHeadline TodayIllegal tendersLife StyleLifestylelocalityMedical activitiesNo justicepoliticalpoliticsprotest for justicepublic awarenessreligionRTI ActivistscamShaurya TimesShiv Sena ShindeSocialstrike against lawtrendingUlhasnagarUlhasnagar Breaking NewsUMC Breaking newsUnder DCP Zone-4Viral VideoWaldhuni Riverwater supply issues

सुभाष टेकडीतील पाणीटंचाईवर तोडगा; शिवसेना शहरप्रमुख रमेश चव्हाण यांचे आमरण उपोषण मागे.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

3, जून 2025,उल्हासनगर-4 सुभाष टेकडी येथील पॅनल 13 व 18 मधील नागरिक भीषण पाणीटंचाईचा सामना करत होते. या गंभीर समस्येच्या विरोधात शिवसेनेचे मा. शहरप्रमुख श्री. रमेश चव्हाण यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आमरण उपोषण सुरू केले होते.

आज (3 जून) उपोषण स्थळी कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) श्री. अशोक घुले, उपअभियंता श्री. परमेश्वर बुडगे, तसेच शाखा अभियंता श्री. हरीश मुरकुटे यांनी भेट देऊन चर्चा केली. त्यांनी येत्या 10 दिवसांत पाणीटंचाई सोडविण्याचे आश्वासन दिले असून, सध्या 1500 चा असलेला पाण्याचा फ्लो आता 1650 पर्यंत वाढविला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

या खात्रीशीर आश्वासनानंतर श्री. रमेश चव्हाण यांनी उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. या वेळी शिवसेनेचे संभाजी चौक शाखा पदाधिकारी, जय महाराष्ट्र मित्र मंडळ, युवासेना, महिला आघाडी, तसेच सुभाष टेकडी व साईबाबा नगर येथील स्थानिक रहिवासी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

नागरिकांच्या पाणी प्रश्नावर लवकरच दिलासा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights