Breaking NewsHeadline TodayKalyan Breaking NewsMaharashtra

दिव्यांग कल्याण मंत्रालयाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा: दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा मागणी.

कल्याण: नीतू विश्वकर्मा

भारतातील पहिले दिव्यांग मंत्रालय निर्माण केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मनापासून आभार मानत, दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियानाचे अध्यक्ष पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे.

अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यांनी असे नमूद केले की, “दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी मंत्रालयाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. पदावर राहून हे काम होण्याची शक्यता मला कमी वाटते. दिव्यांगांसोबत कोणत्याही प्रकारची बेईमानी मला स्वीकार्य नाही.”

यासोबतच त्यांनी आपल्यावर असलेली सुरक्षा काढून टाकण्याचीही मागणी केली आहे. “कुठल्याही प्रकारची सुरक्षा ठेवण्यात येऊ नये,” असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.

राजीनामा स्वीकृत करून दिव्यांगांच्या प्रलंबित विकासकामांसाठी प्रशासनाने आवश्यक पावले उचलावीत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights