Breaking NewsDombivliheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking NewspoliticsSocialUlhasnagarUlhasnagar Breaking News

डोंबिवलीसाठी ५८५ कोटींची स्वतंत्र पाणी योजना; शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित होणार.

डोंबिवली : नीतू विश्वकर्मा

बारवी पाणी पुरवठा योजनेवरील वाढती मागणीमुळे डोंबिवली औद्योगिक क्षेत्राकरीता कमी दाबाने अपुरा पाणी पुरवठा होत असल्याने डोंबिवली औद्योगिक क्षेत्रातील – परिसरातील ग्राहकाच्या अपु-या पाणी पुरवठयाच्या तक्रारी वाढल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर कल्याण – डोंबिवली शहरातील काही भाग, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या भागातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी शहाड पाणी पुरवठा योजना पुनर्जीवित करण्यात येत असून यासाठी एमआयडीसीच्या माध्यमातून ५८५ कोटी रुपयांचा निधीला मंजुरी देण्यात आली आहे. याअंतर्गत जलवाहिनी टाकण्याबरोबरच विविध कामे केली जाणार आहेत. या योजनेच्या पुनर्जीवनासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला यश मिळाले असून कल्याण, डोंबिवली आणि आसपासच्या विभागातील नागरिकांची पाण्याची समस्या मार्गी लागणार आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातुन मतदारसंघातील शहरांना मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहे. कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या ग्रामीण भागातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा व्हावा यासाठी कोट्यवधी रुपयांच्या निधीतून जल जीवन मिशन राबविण्यात येत आहे. याच पद्धतीने कल्याण, डोंबिवली, डोंबिवली औद्योगिक क्षेत्र आणि आसपासच्या परिसरातील नागरिकांना मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी राज्याचा पाणी पुरवठा विभाग, एमआयडीसी यांच्या समवेत सातत्याने बैठका घेऊन वाढीव पाणी पुरवठ्याची मागणी केली होती. यामागणीनुसार कल्याण डोंबिवली शहराला वाढीव पाणी पुरवठा देखील मिळाला आहे. मात्र यापुढेही जाऊन नागरिकांना अधिक दाबाने मुबलक पाणी पुरवठा व्हावा यासाठी गेले काही वर्ष बंद असलेली शहाड पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरु करण्यासाठी खासदार डॉ. शिंदे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शहाड येथे १८० द. ल ली. प्रति दिन क्षमतेची शहाड पाणी पुरवठा योजना सन १९६६ पासून तीन टप्यात बांधण्यात आली होती. या योजनेतून उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली तसेस डोंबिवली औधोगिक क्षेत्र साठी पाणी पुरवठा करण्यात येत होता. बारवी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित झाल्यावर कालांतराने शहाड पाणी पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा फक्त उल्हास नगर शहरासाठी सीमित करण्यात आला आहे.

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights
What do you like about this page?

0 / 400