Breaking NewsheadlineHeadline TodaySocialUlhasnagarUlhasnagar Breaking News

नवपंख फाउंडेशन व केसरी मित्र मंडळाच्या वतीने शासकीय दाखले शिबिराचे आयोजन.

उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा

दरवर्षी प्रमाणे यंदाही विद्यार्थी व नागरिकांसाठी कॉलेज प्रवेश प्रक्रियेसाठी व इतर कामांसाठी आवश्यक असणारे शासकीय दाखले बनविण्यासाठी, शहरातील सामाजिक संस्थांच्या वतीने दि २१/०७/२४ रोजी, महाराष्ट्र मित्र मंडळ शाळा, उल्हासनगर-१, येथे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात उत्पन्नाचा दाखला, अधिवास दाखला, रहिवास दाखला, नवीन मतदार नोंदणी, ज्येष्ठ नागरिक दाखला असे दाखले बनविण्यासाठी फॉर्म भरून घेण्यात आले. शहरातील शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून फॉर्म भरले. या शिबिराचा जवळपास ४०० हुन अधिक नागरिकांनी फायदा घेतला.या वेळी आयोजकांनी  मनःपूर्वक आभार व्यक्त केले.हे शिबिर यशस्वी करण्यासाठी शहरातील सर्वच सामाजिक संस्था व मंडळे यांच्या पदाधिकारी यांनी विशेष मेहनत घेतली व शिबिर यशस्वीपणे पार पाडले.

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights