कल्याण : नीतू विश्वकर्मा
कल्याण नगर हायवे लागत असलेल्या म्हारळ-वरप गावात पारनेर आणि नगर जिल्हयातील रहिवासी मोठ्या प्रमाणत वास्तव्यात आहे. ज्यांनी नगर जिल्ह्यावर 70 वर्ष राज्य केलं असे राधाकृष्ण विखे पाटील यांचे सुपुत्र सुजय विखे यांना धूळ चारण्याचे काम गोरगरिबांचा कैवारी जनसामान्यांचा नेता लोकनेते निलेश लंके यांचा मोठ्या मताधिक्याने विजयी झाल्याबद्दल कल्याण मधील नगरकरांनी पारनेरकरांनी हलगीच्या तालावर ठेका धरत फटाके गुलाल उधळून जल्लोष साजरा केला.


