उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा
आज दिनांक २५ मार्च २०२३ रोजी महाराष्ट्र शासनाचे मुख्यमंत्री श्री.एकनाथ जी शिंदे साहेब यांना जयेश जाधव कल्याण लोकसभा अध्यक्ष RPI यांनी निवेदनाद्वारे विनंती केली आहे की उल्हासनगर महानगरपालिका चे नगररचनाकार यांच्या वर अनेक सामाजिक संघटना राजकीय पक्ष सामान्य नागरिक यांनी पदाचा दुरुपयोग केल्याचे आरोप केल्या बाबद निदर्शनात आणून दिले असून त्यांच्या विरोधात चौकशी समिती नेमावी तसेच जो प्रयत्न समितीचे उत्तर प्राप्त होत नाही तो वर त्यांना त्यांच्या पदापासून मुक्त करावे अशी विनंती केली आहे.तसेच जर चौकशी समिती नेमण्यात आली नाही तर महापालिका मुख्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.


