रिजन्सी अंटलिया मध्ये गणपती विसर्जनसाठी स्थानिकांची अडवणूक परंतु छट पूजा मात्र जोरात.
म्हारळ:- नीतू विश्वकर्मा
रिजन्सी अंटलिया मध्ये गणपती विसर्जनसाठी कल्याण तालुका पोलिस स्टेशन कडून बंदी घातली होती.परंतु आता छट पूजा मात्र नदीवर जोरात करण्यास कोणतीही बंदी घालण्यात आली नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.स्थानिक नागरिकांना त्याच्या सण उत्सवात विरोध आणि परप्रांतीयांना पहिले प्राधान्य असे सवाल स्थानिक नागरिक करत आहे. त्या ठिकाणी उद्यानाचे काम सुरू आहे व नदीच्या बाजूला कुठल्याही प्रकारची तटबंदी नाही. सुरक्षतेच्या दृष्टिकोनातून खूप मोठी दुर्घटना घडू शकते या कडे पोलीस प्रशासनाने लक्ष दिले पाहिजे.या उद्यानाचे काम नदीचा प्रवाह अडवून सर्रासपणे उद्यानाचे काम सुरू आहे या उद्यानाला पर्यावरण मित्रांनी देखील विरोध दर्शवला आहे. नियम सर्वांना समान लागू पाहिजे जर पोलिसांनी गणेश विसर्जनाला परवानगी नाही दिली तसेच छटपूजेला देखील परवानगी देऊ नये असे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे आहे.याच उल्हासनदीचे पाणी पिण्यासाठी उल्हासनगर,कल्याण, भिवंडी, ठाणे, मिरा भाईंदर पर्यंत पिण्यासाठी पुरवले जाते.छट पूज वेळी हजारो नागरिकद्वारे नदीत केली जाणारी छट पूजा यामुळे नदी प्रदूषित होणार नाही. हजारो नागरिक नदी पात्रात उतरणार कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही कशा वरून की फक्त गणेश विसर्जना वेळीच नदी प्रदूषण होते असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला असून मतांच्या गोळा बेरीजसाठी स्थानिक आमदाराचा पुढाकार असेल असे म्हटले तरी काही वावगे ठरणार नाही.आता कल्याण तालुका पोलिस स्टेशन गणेश विसर्जनास ज्या प्रमाणे बंदी घातली त्या प्रमाणे उल्हासनदी किनारी केली जाणारी छट पूजासाठी रिजन्सी अंटलिया मध्ये बंदी घालणार का या कडे स्थानिकांचे लक्ष लागले असून या ठिकाणी इतकी मोठी प्रचंड गर्दी होते की ५०/६० पोलीस कर्मचारी देखील कमी पडतील एवढे अडथळे असताना कल्याण तालुका पोलिस स्टेशन दुटप्पी भूमिका घेणार का हा येणारा काळाच ठरवेल?