काँग्रेसची पार्टी आता या निवडणुकीत पूर्ण ताकदीने दिसणार!
उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर टिळक भवन येथे काँग्रेस पक्षाची महत्वपूर्ण बैठक



मुंबई प्रतिनिधि: नीतू विश्वकर्मा
आगामी उल्हासनगर महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने सज्जतेचे रणशिंग फुंकले आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने टिळक भवन, दादर (मुंबई) येथे महत्वाची बैठक घेत आगामी निवडणुकीत संपूर्ण ताकदीने उतरायची भूमिका स्पष्ट केली.
या बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. हर्षवर्धन सपकाळ होते. या वेळी प्रदेश उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील, नांदेडचे खासदार मा. रविंद्र चव्हाण आणि उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष रोहित साळवे यांची विशेष उपस्थिती होती.
बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीतील रणनीती, जनतेच्या मुद्द्यांवर आंदोलनात्मक भूमिका आणि पक्ष संघटन मजबूत करण्यावर भर देण्यात आला. हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “उल्हासनगर शहरातील नागरिक सत्ताधाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळले आहेत. काँग्रेसने सामान्य जनतेच्या प्रश्नांवर ठाम भूमिका घेऊन तळागाळातील लोकांमध्ये आपली पकड मजबूत करणे गरजेचे आहे.”
जिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत निर्णायक विजय मिळवण्यासाठीची रणनीती प्रदेशाध्यक्षांसमोर मांडली. विशेषतः उल्हासनगरातील २०२२ पूर्वीच्या सर्व बांधकामांचे रेग्युलरायझेशन करण्याचा मुद्दा अधिवेशनात प्रभावीपणे मांडण्याचा ठराव यावेळी करण्यात आला.
या बैठकीस माजी नगरसेविका अंजलीताई साळवे, किशोर धडके, नानिक आहुजा, सुनील बहराणी, मनीषा महाकाळे, सिंधुताई रामटेके, श्याम मढवी, महादेव शेलार, राजेश फक्के, कुलदीप आयलशिंगानी, दीपक सोनोने, फमिदा सय्यद, युवराज पगारे, डॉ. धीरज पटोले, डॉ. हितेश सचवानी, वामदेव भोयर, चिराग फक्के, आबासाहेब साठे, निलेश जाधव, अनिल यादव, ईश्वर जग्याशी, पवन मीराणी, उषा गिरी, विद्या शर्मा, समाधान खरे आदी पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
या बैठकीनंतर काँग्रेस शिष्टमंडळाने मा. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना रेग्युलरायझेशन संदर्भातील निवेदन सादर केले.