ArticleAwarenessBreaking NewsCorruptionCorruption CaseExtortion And Illegal BusinessfeaturedfraudulentGadgetsguidelines CrimeheadlineHeadline TodayIllegal tendersLife StyleLifestylelocalityMedical activitiesNo justicepoliticalpoliticsprotest for justicepublic awarenessRTI ActivistscamShaurya TimesSocialstrike against lawTransportation ServicestrendingUlhasnagarUlhasnagar Breaking NewsUlhasnagar Crime CityUMC Breaking newsUnder DCP Zone-4Viral VideoWaldhuni Riverwater supply issues

सुभाष टेकडीतील पाणीपुरवठ्यावर गंभीर फसवणूक? – अधिकाऱ्यांनी आमदारांच्या नावे ‘खोटे समाधानपत्र’ व्हायरल केल्याचा आरोप!


उल्हासनगर प्रतिनिधि: नीतू विश्वकर्मा

उल्हासनगर-४ मधील सुभाष टेकडी, कुर्ला कॅम्प आणि समता नगर परिसरात गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर समस्येवर आता प्रशासनातील फसव्या कारभाराचा पर्दाफाश झाला आहे.
स्वराज्य संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अँड. जय गायकवाड यांनी अंबरनाथचे आमदार डॉ. बालाजी किणीकर यांना थेट पत्र लिहून अधिकाऱ्यांकडून नागरिकांची व त्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.




📌 प्रकरण नेमकं काय?

२ जून २०२५ रोजी पाणीपुरवठा विभागाने आमदारांच्या नावे एक पत्र व्हॉट्सअ‍ॅपवर व्हायरल केले. या पत्रात सुभाष टेकडीसाठी “नवीन पाणीपुरवठा वेळ निश्चित केल्याचे” सांगण्यात आले.

काहींनी याला “पहिली वेळ निर्धारण” म्हणून प्रचार केला.

पण वस्तुस्थिती ही की, या परिसरासाठी आधीच वेळ निश्चित करण्यात आलेली होती.





📂 आधीच वेळ निश्चित झाली होती!

२८ फेब्रुवारी २०२५ – अँड. प्रशांत चंदनशिवे यांना लेखी वेळेची माहिती.

२६ मार्च २०२५ – अँड. जय गायकवाड व अँड. राहुल बनकर यांनाही तीच माहिती दिली.

२८ एप्रिल २०२५ – महापालिकेने संकेतस्थळावर अधिकृत वेळापत्रक प्रकाशित केले, ज्यात सुभाष टेकडीचा समावेश होता.





🚨 मग आता हे नवीन पत्र कशासाठी?

अँड. गायकवाड यांच्या मते, या खोट्या पत्राद्वारे नागरिकांची दिशाभूल करून अधिकाऱ्यांनी आमदारांच्या नावे खोटे समाधान निर्माण केले आहे.
ही केवळ माहितीची चूक नसून, यामागे हेतुपुरस्सर गोंधळ निर्माण करून आंदोलनाची धार कमी करण्याचा प्रयत्न आहे.




स्वराज्य संघटनेची मागणी स्पष्ट –

> “हे आंदोलन केवळ वेळ निश्चित करण्यासाठी नव्हते, तर वेळेवर, स्वच्छ आणि समान पाणी मिळवण्यासाठी आहे — आणि ती मागणी अद्याप पूर्ण झालेली नाही!”



आजही:

पाणी वेळेवर येत नाही

आलेले पाणी अस्वच्छ असते

काही भागांमध्ये पाणी अजूनही मिळत नाही



📣 अँड. जय गायकवाड यांची मागणी –

1. या अधिकाऱ्यांकडून तातडीने स्पष्टीकरण घ्यावे – आधीच वेळ निश्चित असूनही नवीन पत्र का काढले?


2. “निश्चित वेळेत, स्वच्छ आणि समान पाणी” – हा पुरवठा कधीपासून सुरू होणार आहे, याबाबत लेखी आश्वासन घ्यावे.


3. या संपूर्ण प्रकरणावर सार्वजनिक भूमिका जाहीर करावी.



⚠️ जनता जागरूक व्हा!

> “पाणीपुरवठ्याच्या नावाखाली समाधानाचे केवळ व्हॉट्सअ‍ॅप मेसेज नकोत, हक्काचे व स्वच्छ पाणी हवे!”


🗣️ आता जनतेने प्रश्न विचारायला हवा –
खरंच ‘समाधान’ मिळाले का, की केवळ ‘भास’ निर्माण केला जात आहे?




📰 शौर्य टाइम्स

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights