Ambernath breaking news

अंबरनाथ व उल्हासनगर मधिल विकास कामे जलदगतीने मार्गी लावणार.










उल्हासनगर: नीतू विश्वकर्मा


अंबरनाथ व उल्हासनगर मधिल विविध विकास कामांसंदर्भात आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सोमवारी ठाणे जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे यांची भेट घेत विकास कामांसंदर्भात सविस्तर चर्चा केली.


या दरम्यान अंबरनाथ मधिल पालेगाव व फणसीपाडा या गावातील वाढती लोकसंख्या लक्षात घेता या गावांची हद्दवाढ करण्यात यावी अशी मागणी स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांकडून होत आहे. या गावांलगत शासनाच्या मालकीच्या असलेल्या गुरचरण जमिनीचा गावठाणात समावेश करून या गावांची हद्दवाढ करण्यात आल्यास गावांचा विस्तार होऊन मूलभूत सुविधा पुरविणे नगरपरिषदेस ही शक्य होऊ शकेल असे मत आमदार डॉ.किणीकर यांनी यावेळी मांडले यावर  सकारात्मक प्रतिसाद देत याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्याचे जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी आमदार डॉ.बालाजी किणीकर यांना आश्वासन दिले आहे.


तसेच अंबरनाथ मधील जेष्ठ नागरिकांकरिता वडवली विभागातील शासनाच्या मालकीच्या व सूर्योदय सोसायटीचा विना वाटप असलेला भूखंड क्र.६०६ येथे जेष्ठ नागरीकांकरिता जिल्हा नियोजन समिती मार्फत “विरंगुळा केंद्र” उभारण्यात यावे अशी मागणी आमदार डॉ. किणीकर यांनी केली त्यानुसार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत विरंगुळा केंद्र उभारण्यासंदर्भात आवश्यक अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी अंबरनाथ नगरपरिषद मुख्याधिकारी यांना दिल्या आहेत.तसेच उल्हासनगर – ५ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पटेल नगर मधील शासनाच्या मालकीच्या जागेवर सद्या मोडकळीस आलेल्या पोलीस वसाहती असून या सद्या विनावापर आहेत. याठिकाणी  एम.पी.एस.सी. व यु.पी.एस. सी. सारख्या स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा केंद्र उभारण्यात यावे. तसेच तमाम सिंधी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या पूज्य चालिया साहेब मंदिरात देश – विदेशातून भाविक तसेच पर्यटक येत असतात. त्यांना  राहण्याची सोय त्याचबरोबर त्यांना सिंधू संस्कृतीबद्दल माहिती मिळावी या उद्देशाने उल्हासनगर -५ येथील लालचक्की परिसरातील बरेक नं.२१०८ च्या बाजूला असलेल्या शासनाच्या मोकळ्या जागेत “सिंधू भवन व यात्री निवास” उभारण्यात यावे अशी देखील मागणी आमदार डॉ.किणीकर यांनी केली. महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत या प्रस्तावानुसार अंदाजपत्रक सादर करण्याच्या सूचना देखील जिल्हाधिकारी श्री.शिनगारे यांनी उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना दिल्या आहेत.


तसेच उल्हासनगर शहरातील मुख्य रस्त्यांपैकी असलेल्या कैलाश कॉलनी मार्गे मठ मंदिर दुधनाकाकडे जाणारा रस्ता आणि नेताजी चौक ते मठ मंदिर मार्गे तहसील कार्यालय आणि निजधाम आश्रमकडे जाणाऱ्या रस्त्याचे देखील महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महभियान जिल्हास्तर योजनेअंतर्गत काँक्रीटीकरण करण्यात येणार असून याबाबतचे अंदाजपत्रक सादर करण्याच्या लेखी सूचना उल्हासनगर महापालिका आयुक्त यांना जिल्हाधिकारी श्री. शिणगारे यांनी दिल्या आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Verified by MonsterInsights