उल्हासनगरमध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ मोहिमेतील शौर्याचा गौरव : तिरंगा रॅली व सद्भावना कार्यक्रमाचे आयोजन



उल्हासनगर : नीतू विश्वकर्मा
भारतीय सैन्य दलाच्या अभिमानास्पद शौर्यगाथेला वंदन करत, ऑपरेशन सिंदूर मोहिमेतील वीर जवानांच्या शौर्याचा गौरव करण्यासाठी उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने तिरंगा रॅली व श्रद्धांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. श्री. हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आला. नुकत्याच पार पडलेल्या ऑपरेशन सिंदूर या मोहिमेत भारतीय सैन्याने दाखवलेले धैर्य व राष्ट्रनिष्ठा हे अत्यंत गौरवास्पद आहे. या पार्श्वभूमीवर, स्वर्गीय राजीव गांधी यांच्या स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.बुधवार, २१ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उल्हासनगर कॅम्प २ येथील सपना गार्डन, राजीव गांधी उद्यान येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात राजीव गांधी उद्यानातील समाज हॉलमध्ये स्व. राजीव गांधी यांना आदरांजली अर्पण करून करण्यात आली.
त्यानंतर ऑपरेशन सिंदूर मोहिमेतील शहीद जवान तसेच आतंकी हल्ल्यांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.यानंतर विविध मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त करत भारतीय सैन्य दलाच्या शौर्याचे कौतुक केले.श्रद्धांजली कार्यक्रमानंतर सर्व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी हातात तिरंगा धारण करत, “भारत माता की जय” आणि “याद करो कुर्बानी” अशा घोषणांसह परिसरात भव्य रॅली काढली. रॅलीदरम्यान भारतीय सैन्याच्या शौर्याचा जयघोष करण्यात आला.या कार्यक्रमात उल्हासनगर काँग्रेस कमिटी अंतर्गत विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, माजी नगरसेविका अंजली साळवे, महिला अध्यक्ष मनीषा महाकाळे, प्रवक्ते अशेराम टाक, प्रो. गेम्नांनी, श्याम मढवी, डॉ. हितेश साचवणी, कुलदीप ऐलसिंह, फमीदा सय्यद, पुष्पलता सिंग, उषा गिरी, सिंधुताई रामटेके, वामदेव भोयर, आबा साठे, निलेश जाधव, राजेश फक्के, बापू पगारे, विद्या शर्मा, मालती गवई, राजकुमारी नारा, ईश्वर जगियाशी, देव आठवले, अन्सार शेख, दीपक गायकवाड आणि इतर अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.सेल व विभाग अध्यक्ष, ब्लॉक पदाधिकारी आणि इतर सर्वच घटकांचे प्रतिनिधी या कार्यक्रमात सहभागी झाले होते.कार्यक्रमाचे नेतृत्व उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. रोहित साळवे यांनी केले.