Breaking NewsheadlineHeadline TodaykalyanKalyan Breaking News

पुन्हा एकदा जनआन्दोलना ची तैयारी.

 

कल्याण पूर्व:  नीतू विश्वकर्मा

कल्याण पूर्वेतील विठ्ठलवाडी येथे वालधुनी नदीच्या उपनदी ची स्वछता, खोलीकरण, रुंदीकरण, तसेच पुर परिस्थिती उपाययोजना करणेकामी प्रशासनास पत्र देऊन वसुंधरा दिवस 22 एप्रिल पासुन सह्यांची मोहिम राबवली गेली, त्याप्रसंगी शेकडो स्थानिकांनी पुढाकार घेऊन सह्या दिल्या,1 मे रोजी सांकेतिक धरणे व 15 दिवसात उपाययोजना न केल्यास 8 मे पासुन साखळी उपोषणाचा स्थानिकां तर्फे इशारा सुद्धा देण्यात आला होता,परंतु कडोंमपा सहायक आयुक्त यांचे आश्वासनानंतर आंदोलन तुर्तास स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता,परंतु आता उपाययोजना होताना दिसत नसल्यामुळे पुन्हा एकदा जनआन्दोलना ची तैयारी करण्यात येत आहे,गेल्या काही वर्षांपासून भूमाफियांकडून वालधुनी उपनदीच्या पात्रात ठिकठिकाणी भराव टाकून अतिक्रमणे केली जात असल्याने या नदीला नाल्याचे स्वरूप आले आहे. तरी ‘नेरी’ संस्थेच्या अहवाला प्रमाणे वालधुनी नदीला तिचे मूळ विस्तारित स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी त्यामध्ये होणारी अतिक्रमणे रोखणे आवश्यक झाले आहे.त्याच प्रमाणे उपनदी चे स्वछता करुन मळ, गाळ काढणे, खोलीकरण रुंदीकरण करणे आवश्यक झाले आहे,लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष आणि प्रचंड नागरीकरणा मुळे गेल्या काही वर्षात वालधुनी नदी च्या ह्या उपनदी ला नाल्याचे स्वरूप आले आहे. नदी किनारी उभ्या राहिलेल्या रासायनिक कारखाने, कापड-जीन्सवर प्रक्रिया करणारे उद्योगांनी, काही इतर प्रकल्पांनी रासायनिक, मलयुक्त सांडपाणी या नदीत सोडल्यामुळे हा नैसर्गिक प्रवाह व उपनदी पूर्णत: प्रदूषित झाली आहे.त्याच प्रमाणे अनेक वेळा पुरपरिस्थिति निर्माण होत आली आहे, ज्यामुळे विठ्ठलवाडी रेल्वे स्टेशन समोर वस्तीमध्ये वालधुनी उपनदीलगतच्या स्थानिकाना दरवर्षी त्रास सहन करावा लागत आहे,त्याच प्रमाणे एका भूखंडालगत नदीच्या पात्रात अतिक्रमण, तर शिवाजीनगर येथे नदीच्या पात्रात भूमाफियांनी भराव टाकून अतिक्रमण करीत त्यावर रस्ता तयार केला आहे. भूमाफियांकडून मोठ्या प्रमाणात टाकण्यात आलेल्या भरावामुळे नदी किनारच्या सखल भागातील चाळवस्तीमध्ये पाणी शिरून त्यांचे नुकसान होण्याची शक्यता अधिक पटीने वाढली आहे.

Shaurya Times

🛡️ Shaurya Time’s – Your Voice, Our Questions! A fearless digital news platform focused on public safety, justice, and accountability. We expose: ✅ Ground realities ✅ RTI & official documents ✅ Civic failures & scams ✅ Crime, corruption & cover-ups Bold journalism. Real issues. No compromise. Because awareness is the first step to change. 📢 Shaurya Time’s – Reporting the truth, without fear!

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button

कंटेंट चुराना पाप है। चुराने की बजाय खुद कंटेंट लिखें।
- नीतू विश्वकर्मा

Verified by MonsterInsights